संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.३०मार्च २०२५
प्रतिनिधी,
पारनेर दैठणे गुंजाळ येथील आजीनाथ रावसाहेब गुंजाळ यांची आर्मी अग्निविर मध्ये निवड झाली असुन दैठणे गुंजाळ येथील नवयुवकांनी DJ लावून श्रीक्षेत्र खंडेराव याचे दर्शन घेऊन मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढून जल्लोष व्यक्त केला.
भारत देशाच्या संरक्षण सेवेत प्रत्येक युवकांनी सहभाग घेतला पाहिजे, देशप्रेम व्यक्त केले पाहिजे ही या मागची भावना असायला हवीअशी प्रतिक्रीया या प्रसंगी मेजर बाजीराव दरेकर यांनी व्यक्त केली.
यावर बोलताना आजिनाथ गुंजाळ यांनी सर्वांचे आभार मानत देशाच्या संरक्षण सेवेत निवड झाली या संधीचे सोनं करणार असून कुटुंबाचं, गावचं आणि देशाचं नाव उज्वल करेल असे सांगितले.
या जंगी मिरवणूक सोहळ्याचे नियोजन सौरभ कळमकर, रोहित घोपल,प्रवीण गुंजाळ, ऋतिक ठाणगे,ओम येवले,
ऋषिकेश गुंजाळ, आदेश गुंजाळ (पोलीस) यांनी केले होते.
यावेळी दैठणे गुंजाळ येथील मान्यवर, ग्रामस्थ ,आप्तेष्ट नातेवाईक उपस्थीत होते.
अजिनाथ गुंजाळ यांच्या सार्थ निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.