सेल्फी बेतली जिवावर शेततळ्याने घेतले दोन बळी..

श्रीगोंदा ​​​​​​| संघर्षनामा न्युज 

प्रतिनिधी - श्रीगोंदा शहराजवळ आनंदकर मळ्यातील शेततळ्यावर सेल्फीच्या नादात तळ्यात पाय घसरून पडल्यामुळे दोन परप्रांतीय तरुणांचा रविवार दि. २ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास बुडून मृत्यू झाला आहे. या दुःखद घटनेमुळे शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

        मूळ राजस्थानी फर्निचर कारागीर असलेले सुरेंद्रकुमार हारडू (वय १८ वर्षे) व लक्ष्मण ओमनाथ (वय १७ वर्षे ९ महिने) हे दोन तरूण रविवारी अमावास्या असल्यामुळे कामावर सुट्टीला होते. आनंदकर मळ्यात फिरायला गेल्यावर तेथील शेत तळ्यात मोबाईलवर सेल्फी काढण्याचा मोह झाला. त्यांच्याबरोबर अजून दोघेजण सहकारी तरुण होते त्यातील सुरेंद्रकुमार व लक्ष्मण हे दोघे सेल्फी काढत असताना एकाचा तोल जाऊन तळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या तरुणाने तळ्यात उडी मारली. पोहता येत नसल्याने दोघे बुडू लागल्याने वर उभ्या असणाऱ्या तरुणांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला व लोक जमा झाले परंतु तोपर्यत या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. 
        माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस हवालदार संदीप शिरसाठ यांनी भेट दिली. पुढील तपास शिरसाठ करत आहेत.

Related Post