जयपूर येथे २६ आणि २७ ला पत्रकारांच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.३एप्रील २०२५

प्रतिनिधी,

जयपुर- असोसिएशन ऑफ स्मॉल अँड  मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या संघटनेचे 31 वे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 26 व 27 एप्रिल 2025 रोजी राजस्थान राज्यातील जयपूर येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे राजस्थान राज्य अध्यक्ष गोपाल गुप्ता यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती सांगताना संघटनेचे राज्य अध्यक्ष गोपाल गुप्ता यांनी म्हटले आहे की या अधिवेशनामध्ये भारत देशातील विविध राज्यातून जवळपास 350 प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता आहे. 

 या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळी या संघटनेची स्थापना 1986 साली  झाली त्यावेळी पहिले अधिवेशन राजस्थान मधील जयपूर येथे संपन्न झाले होते आणि त्यावेळी राज्यपाल म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले वसंत दादा पाटील हे होते. त्यावेळी संघटनेच्या संपन्न झालेल्या अधिवेशना मध्ये तत्कालीन राजस्थानचे राज्यपाल कै. वसंत दादा पाटील हे प्रमुख पाहुणे होते. तर आताचा योगायोग असा की आज हेच अधिवेशन राजस्थान मधील जयपूर येथे संपन्न होत आहे तर आज राजस्थानचे राज्यपाल म्हणून महाराष्ट्राचे हरिभाऊ नाना बागडे हे काम पाहत आहेत. आणि या अधिवेशनात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने एक सुंदर अशी स्मरणिका प्रसिद्ध करण्यात येणार असून या स्मरणिकेचे नाव "कलम कुंभ" असे देण्यात आले आहे या स्मरणिकेमध्ये विविध राज्यांच्या पत्रकारितेचा इतिहास संकलित करण्यात आलेला आहे.  स्मरणिकेच्या मुखपृष्ठावर राज्यातील प्रमुख दुर्गा सहित जयपूरचे आराध्य दैवत असलेले गोविंद देव यांचे सुंदर असे चित्र प्रकाशित करण्यात आले आहे‌  याचबरोबर आग्रपुज्य मोती डोंगरी गणेशजी यांचे चित्र  प्रकाशित करण्यात आले आहे.

देशभरातील अनेक राज्यातील पत्रकारितेचा इतिहास या स्मरणिकेचे वैशिष्ट्य असणार आहे. ही स्मरणिका सुंदर करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. 

अधिवेशनाच्या उद्घाटन सत्राच्या नंतर दोन सत्रांमध्ये हे अधिवेशन संपन्न होणार असून या अधिवेशनामध्ये छोट्या आणि मध्यम वृत्तपत्राच्या विविध समस्या अडीअडचणी आणि संघटनेच्या बांधणीवर विशेषत्वाने चर्चा करण्यात येणार आहे.  त्याचबरोबर ज्या संपादकांना पत्रकारितेमध्ये पन्नास वर्षाहून अधिक काळ ते पत्रकारिता करत आहेत अशा पत्रकारांचा गौरव संघटनेच्या वतीने या अधिवेशनात करण्यात येणार आहे. 

अधिवेशनाच्या तयारीसाठी एक आयोजन समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीला जयपूर महानगर टाइम्सचे संस्थापक तथा आमदार गोपाल शर्मा हे आवर्जून उपस्थित होते‌  आणि त्यांनी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. 

हे अधिवेशन चांगल्या आणि उत्तम रीतीने पार पडावे यासाठी असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या संघटनेची राजस्थान शाखा संपूर्णपणे कार्यरत आहे

Related Post