मध्यपूर्व व गल्फमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाची नागरिकांना तातडीची सूचना

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि. २ मार्च २०२६ 

अहिल्यानगर । प्रतिनिधी

मध्यपूर्व व गल्फ परिसरात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने तसेच विविध भारतीय दूतावासांनी २४x७ आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत. महाराष्ट्र शासनानेही या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आवश्यक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.

राज्य आपत्कालीन कार्यकक्ष (२४x७) मार्फत आपत्ती, आपत्कालीन परिस्थिती किंवा परदेशातील व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती मिळविण्यासाठी नागरिकांनी १०७० (टोल फ्री), ०२२-२२२०२७९९०, +९१-९३२१५८७१४३ या क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच controlroom@mea.gov.in या ईमेलवरही संपर्क साधता येईल.

विविध देशांतील भारतीय दूतावासांचे आपत्कालीन संपर्क क्रमांक:

रामल्लाह (पॅलेस्टाईन): +970592916418 | repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in

दोहा (कतार): 00974-55647502 | cons.doha@mea.gov.in

रियाध (सौदी अरेबिया): 00-966-11-4884697 | WhatsApp: 00-966-542126748 | टोल फ्री: 800 247 1234 | cw.riyadh@mea.gov.in

तेल अवीव (इस्रायल): +972-54-7520711 / +972-54-2428378 | cons1.telaviv@mea.gov.in

तेहरान (इराण): +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359

अबुधाबी (संयुक्त अरब अमिरात): टोल फ्री 800-4634242 | WhatsApp: +971543090571 | pbs.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in

कुवेत: +96565501946 | community.kuwait@mea.gov.in

बहरीन: 00973-39418071

मस्कत (ओमान): टोल फ्री 80071234 | WhatsApp: +96898282270 | cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in

जॉर्डन: 00962-770 422 276

बगदाद (इराक): +964 771 651 1185 / +964 770444 4899 | cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना:

सुरक्षित ठिकाणी राहावे व अनावश्यक हालचाल टाळावी.

भारतीय दूतावास/कॉन्सुलेटच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.

आपले लोकेशन व स्थिती कुटुंबियांना सतत कळवावी.

मोबाईल चार्ज ठेवावा व आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत.

सोशल मीडियावर अफवा, अप्रमाणित संदेश किंवा चुकीची माहिती पसरवू नये.

दूतावासांकडे नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासन व भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय (MEA) परदेशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४x७ दक्ष असून, संरक्षण, माहिती समन्वय, आवश्यक ती मदत तसेच परिस्थितीनुसार स्थलांतर (Evacuation) प्रक्रियेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मध्यपूर्व व गल्फ परिसरातील जिल्ह्यातील नागरिक अडकले असल्यास त्याबाबतची माहिती तातडीने जिल्हा नियंत्रण कक्षास कळवावी. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४० तसेच टोल फ्री १०७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही प्रसिद्धीपत्रक जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर (क्र. आपत्कालीन/१९३/५६/२०२६, दिनांक ०२/०३/२०२६) यांच्या वतीने जारी करण्यात आली आहे.

Related Post